Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आंदोलनासाठी भाजपा रोजंदारीवर लोकं आणणार का ? नवाब मलिक

4Nawab Malik 14

मुंबई (वृत्तसंस्था) सत्ता गेल्यामुळे भाजपाकडे आता कार्यकर्ते उरलेले नाहीत, कमळाबाईला शिवसेनेने सोडचिठ्ठी दिली आहे. त्यामुळे भाजपा २५ फेब्रुवारीला महाविकास आघाडीच्या सरकारविरोधात मोर्चा काढण्यासाठी कायकर्ते कुठून आणणार, आंदोलनासाठी भाजपा रोजंदारीवर लोकं आणणार का?, असा खोचक सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्य सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांनी विचारला आहे.

 

पुन्हा निवडणूका घ्या अशी मागणी भाजपवाले करत आहेत, पुन्हा निवडणूका होऊं द्या. पाच वर्षांनी निवडणुका होतील, तेव्हा भाजपाच्या आमदारांची संख्या १०५ वरुन १५ वर येईल असे नवाब मलिक म्हणाले. भाजपा २५ फेब्रुवारीला महाविकास आघाडीच्या सरकारविरोधात काढण्यात येणाऱ्या मोर्च्याची त्यांनी खिल्ली उडवलेली आहे.

Exit mobile version