Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

असोदा येथे अस्वच्छ पिण्याचे पाणी पुरवठ्याने ग्रामस्थांत संताप…!

जळगाव प्रतिनिधी। निसर्गकन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे माहेर असलेल्या असोदे गावातील विविध रोगराईला आमंत्रण देणारे पिण्याचे पाणी अत्यंत घाण फिल्टर न झालेले येत असल्याबद्दल असोदा ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले असून संतापही व्यक्त होत आहे.

तर काही सुजाण नागरिकांनी या अस्वच्छ व पिण्यालायक नसलेल्या पाण्याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात यावी असा उपरोधात्मक टोला ही लगावला आहे.दरम्यान असोदा ग्रामपंचायत करते तरी काय ? ग्रामस्थांच्या आरोग्याशी खेळण्याचा काय अधिकार ? असा सूरही जेष्ठ नागरिक व महिलांमध्ये उमटत आहे.लवकरात लवकर स्वच्छ पाणी पुरवठा व्हावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Exit mobile version