जळगाव प्रतिनिधी । शहरातील हरीविठ्ठल नगरात राहणारी १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बेपत्ता विद्यार्थीनीच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीत नमुद केल्या प्रमाणे त्यांची मुली आरती (काल्पनीक नाव) हि मंगळवार(ता.२) रोजी नेहमी प्रमाणे सकाळी कॉलेजला जाते असे सांगत घरुन निघाली होती. संध्याकळ पर्यंत मुगली परत आली नाह्ही म्हणून वडीलांनी पोलिस ठाण्यात हरवल्याची तक्रार दिली. हर्षद देशमुख याने आईवडलांच्या रखवालीतून अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्या प्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली असुन तपास सहाय्यक निरीक्षक राजेश शिंदे करत आहेत.