Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अयोध्येला जाताय जनाची नाही किमान मनाची तरी ; मनसेची उद्धव ठाकरेंवर टीका

 

मुंबई (वृत्तसंस्था) लक्षात ठेवा, प्रभू रामचंद्रांनी वडिलांच्या सांगण्यावरुन सत्तेला लाथ मारुन चौदा वर्ष वनवास भोगला आणि भरताला राज्य दिले. पण भरताने संधीसाधूपणा न करता रामचंद्रांच्या पादुका ठेवून राज्य केले. असा इतिहास असलेल्या अयोध्येला जाताय तेव्हा जाताना जनाची नाही किमान मनाची तरी… शुभेच्छा, असा टोला मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी लगावला आहे.

महाविकास आघाडी सरकाला १०० दिवस पूर्ण होणार आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शनिवारी अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांच्या या अयोध्या दौऱ्यावर संदीप देशपांडे यांनी टीका केली आहे. त्यांनी ट्विटरवरून उद्धव ठाकरे यांच्यावर अयोध्येला जाताय तेव्हा जाताना जनाची नाही किमान मनाची तरी… शुभेच्छा अशा शब्दात निशाणा साधला आहे.

Exit mobile version