Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अमिताभजी आता मुंबईकरांनी कार चालवावी की जाळावी? ; जितेंद्र आव्हाडांचा खोचक सवाल

मुंबई (वृत्तसंस्था) बॉलीवूडचे प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या ८ वर्षांपूर्वीच्या ट्विटवरून लक्ष करत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी त्यांना ‘आता मुंबईकरांनी कार चालवावी की जाळावी?’, असा खोचक प्रश्न विचारला आहे.

 

अमिताभ बच्चन यांनी २४ मे २०१२ साली पेट्रोल, डिझेल दरवाढीवर टीका करताना “पेट्रोलचे दर ७.५ रुपयांनी वाढले. पंप अटेंडन्ट – कितने का डालू? ! मुंबईकर २-४ रुपये का कार के ऊपर स्प्रे कर दे भाई, जलाना है !! असे ट्वीट केले होते. अमिताभ बच्चन यांच्या या ट्विटला जितेंद्र आव्हाड यांनी त्याच खोचक पद्धतीने आता उत्तर दिले आहे. आव्हाड आपल्या ट्विटमध्ये म्हटलेय ‘अमिताभजी तुम्ही पेट्रोल पंपावर तुमच्या गाडीत पेट्रोल भरले नाही की बिल बघितले नाही. तुम्ही बोलण्याची ही वेळ आहे, आशा करतो तुम्ही पक्षपाती नाही. पेट्रोल आणि डिझेलच्या दराने उच्चांक गाठलाय, अब मुंबईकर क्या करे कार जलाए या कार चलाये?. दरम्यान, अमिताभ बच्चन यांच्याआधी आव्हाड यांनी अक्षय कुमारलादेखील त्याच्या जुन्या ट्वीटवरून अशाच प्रकारे खोचक सवाल केला होता.

Exit mobile version