Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अपघातात पाय गमावल्याच्या नैराश्यातून आत्महत्या

.
यावल : प्रतिनिधी । तालुक्यातील नायगाव येथे एका ५२ वर्षीय इसमाने अपघातात पाय गमावल्याच्या नैराश्यातून गळफास घेऊन आत्महत्या केल्याने गावात खळबळ उडाली आहे.

ही घटना शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव अजय सुधाकर देशमुख असे आहे. त्यांचा काही महिन्यापुर्वी अपघात झाला होता. पायाला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांचा पाय कापून टाकावा लागला होता. त्यामुळे ते निराश होते. याचं नैराश्यातून त्यांनी शुक्रवारी घरात गळफास घेऊन आत्महत्या केली असे आप्तस्वकीयांनी सांगितले

त्यांनी गळफास घेतल्याचे निदर्शनास आल्यावर त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. शवविच्छेदन झाल्यावर आज नायगाव येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले . पोलिसात अक्षय देशमुख यांनी दिलेल्या खबरी वरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे, हवालदार सुनिल तायडे हे करीत आहे

Exit mobile version