Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अटवाडे ग्रामपंचायतीच्या सर्व जागा बिनविरोध

रावेर -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जिल्हातील एकमेव ग्राम पंचायत अटवाडे गावच्या सर्व जागा बिनविरोध झाल्या आहे. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी दहा जागेसाठी फक्त दहाच उमेदवारी अर्ज आले आहे.माजी सरपंच गणेश महाजन व जयेश कुवटे यांच्या प्रर्यत्नामुळे सरपंचपद व ग्राम पंचायत सदस्य बिनविरोध झाले आहे.

तालुकाभरात ग्राम पंचायती निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे.आज दि २ शुक्रवार उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख होती.आज अटवाडे गावच्या लोकनियुक्त सरपंच पदासाठी एकच उमेदवारी अर्ज आला व तर नऊ ग्राम पंचायत सदस्य पदासाठी नऊ उमेदवारी अर्ज आल्याने ही ग्राम पंचायत शेवटच्या दिवशी बिनविरोध झाली आहे. येथील सरपंच गणेश महाजन यांच्या अथक प्रर्यत्नामुळे ग्राम पंचायत बिनविरोध होण्याचा बहुमान मिळाला आहे. सर्वसमावेशक उमेदवारांना येथे संधी दिल्याने तसेच ग्रामस्थ एकमताने पाठीशी राहीले म्हणून ग्राम पंचायत बिनविरोध झाल्याचे माजी सरपंच गणेश महाजन यांनी सांगितले.

यांना मिळाली कारभार करण्याची संधी
लोकनियुक्त सरपंच पदी ममता किरण कोळी तर ग्राम पंचायत सदस्य पदी आर के पाटील ,नितिन आत्माराम धनगर ,योगेश सतीष महाजन,पूनम मोहन कोळी ,रेखा किशोर महाजन कल्पना भगवान धनगर,कविता जर्नादन महाजन वर्षा विलास पाटील,गोकुळ भावराव करवले यांचे एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने येथील सर्व जागा बिनविरोध झाल्या आहे.

Exit mobile version