Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अखेर पथदिव्याचा प्रश्न सुटल्याने ग्रामस्थांनी मानले आभार

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील मनवेल गावातील प्रभाग क्रमांक १ मध्ये गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेली विजेची समस्या सुटल्याने वार्डात विजेच्या लखलखाट झाल्याने ग्रामस्थांनी आभार व्यक्त केला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, यावल तालुक्यातील मनवेल येथील थोरगव्हाण रस्ता लगत गावाच्या पुर्वच्या दिशेला असलेल्या प्रभाग क्रमांक १ मध्ये सामाविष्ट आहे. या भागात विजेच्या पोल नसल्यामुळे रहिवाशी त्रस्त होते त्याना विज कनेक्शन करीता व वार्डात पथदिवे  नसल्यामुळे प्रभागात सर्वत्र अंधार होते.

 

ग्रामपंचायत सदंस्या सुंनदाबाई पाटील यांचे पुत्र तथा सामाजिक कार्यकर्ता महेद्र पाटील, ग्रामपंचायत सदस्य नरहर भिल्ल, कमलबाई भिल्ल यांनी सरपंच जयसिंग सोनवणे व उपसरपंच मिनाश्री पाटील, ग्रामपंचायत सदस्य यांच्या सहकार्याने येथील विज वितरण कंपणीचे कंनिष्ट अंभियांता निलेश महाजन, दिनकर माळी व मनवेल येथील लाईमन असलम तडवी यांच्याकडे या वार्डातील विजेच्या खांब उभा करुन नागरीकांची समस्या सोडविण्यासाठी सतत पाठपुरावा करून प्रश्न मार्गी लावला. विजेचे दोन खांब उभे करुन पथदिवे प्रत्यक्षात सुरु झाल्याने या परिसरातील रहिवाश्या ग्रामस्थामध्ये प्रभागाचा क्षेत्र अंधाराकड्डन प्रकाशाकडे आल्याने आनंद व्यक्त करीत ग्रामपंचायतीने केलेल्या या कार्याचे कौतुक करीत समाधान व्यक्त होत आहे.

 

यापुर्वी येथील वार्ड क्रमांक १ मध्ये रस्ता, गटारी व विजेची समस्या सोडविण्यात आली आता पण गावातील थोरगव्हाण रस्त्यावर असलेल्या प्रमुख मार्गा वरील रस्त्याची गटारीची समस्या अद्याप प्रलंबीत आहे.  लोकप्रतीधीनी च्या माध्यमातून गटारीचा प्रस्ताव तयार करुन मार्गी लावण्यासाठी प्रयत्न आहे.  मनवेल ग्रामपंचायतीच्या सदस्या सुंनदाबाई पाटील यांनी माहीती दिली आहे.

Exit mobile version