वावडदा शिवारात शार्टसर्कीटमुळे उसाला आग

नुकसान भरपाई देण्याची मागणी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । वीजेच्या तारांमुळे झालेल्या शॉर्टसर्किटमुळे २ एकर ऊस जळून खाक झाल्याची घटना जळगाव तालुक्यातील वावडदा येथे शनिवारी १३ मे रोजी दुपारी घडली आहे. लागलेल्या आगीत अंदाजे ४ लाख रूपयांचे नुकसान झाल्याचे बोलले जात आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील वावडदा येथील शेतकरी जानकीराम फकीरा पाटील हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शेती करून ते आपला उदरनिर्वाह करतात. त्यांचे जळगाव तालुक्यातील वावडदा शिवारात शेत आहे. या शेतामध्ये त्यांनी उसाची लागवड केलेली आहे. हा ऊस रसवंती करता वापरला जातो. शनिवारी १३ मे रोजी जानकीराम फकीरा पाटील हे शेतात असताना अचानक झालेल्या शार्कसर्किटमुळे ऊसाला आग लागली. या आगीत २ एकर ऊस जळून खाक झाला असून जवळपास चार लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. या संदर्भात अद्याप पोलिसात कुठलीही नोंद करण्यात आलेली नाही. दरम्यान शासनाकडून नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी जानकीराम पाटील यांनी केली आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content