रोजगार हमी योजनेतील मजुरांना माध्यान्ह भोजन व्यवस्था

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील दहिवद गावातील महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतील मजुरांना महाराष्ट्र शासन अंतर्गत माध्यान्ह भोजन व्यवस्था सुरु करण्यात आली.

 

अमळनेर तालुक्यातील दहिगाव येथे माध्यान्ह भोजन व्यवस्था सुरू करण्यात आली आहे. माजी सरपंच प्रवीण काशिनाथ माळी यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी गावातील सरपंच देवानंद बहारे ग्रामपंचायत दहिवद, अनिल माळी माजी उपसरपंच,शिवाजी पारधी ग्रामपंचायत सदस्य,सुनील पाटील ग्रामपंचायत सदस्य,मालुबाई माळी ग्रामपंचायत सदस्य, हिराबाई भिल ग्रामपंचायत सदस्य, वर्षा पाटील ग्रामपंचायत सदस्य, योगिता गोसावी ग्रामपंचायत सदस्य, आशाबाई माळी ग्रामपंचायत सदस्य, वैशाली माळी ग्रामपंचायत सदस्य, राजेंद्र सोनवणे ग्रामविकास अधिकारी, भागवत सोनवणे रोजगार सेवक, भूषण कोळी हिंगोणा, गुलाब पाटील सामजिक कार्यकर्ते, एकनाथ सोनार, रोहिदास माळी, किरण माळी, ग्रामपंचायत कर्मचारी व मजूर मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. महाराष्ट्र शासन अंतर्गत मध्यान  भोजन व्यवस्था सुरू करण्यात आल्यावर सरपंच देवानंद बहारे यांचे सर्व स्तरावरून कौतुकाच्या वर्षाव करण्यात आला.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content