धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने एकाच जागीच मृत्यू

जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील निमखेडी येथील प्रौढ व्यक्तीचा गिरणा नदीजवळील रेल्वे रूळावर धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने जागीच मृत्यू झाल्याची दुदैवी घटना गुरूवार २३ मार्च रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. समाधान रमेश कोळी (वय-४२) रा. निमखेडी ता.जि.जळगाव असे मयत प्रौढ व्यक्तीचे नाव आहे.

 

नातेवाईकांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील निमखेडी गावात समाधान कोळी हे पत्नी व तीन मुलांसोबत वास्तव्याला होतो. मुजरीचे काम करून ते आपला उदरनिर्वाह करत होते. गुरूवारी २३ मार्च रोजी सकाळी घरातून ते बाहेर पडले. गावानजीक असलेल्या गिरणा नदीजवळी रेल्वे रूळ ओलांडत असतांना अचानक आलेल्या धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना घडल्यानंतर गावात राहणाऱ्या ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेवून पोलीसांना माहिती दिली. पोलीस कर्मचारी घटनास्थळी येवून मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आला. यावेळी गावातील ग्रामस्थ, मित्र मंडळी यांनी मोठी गर्दी केली होती. या घटनेबाबत जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content

%d bloggers like this: